सोलापूर - येथे नियमित विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालकेत सर्वानुमते झाला. सोलापूर महानगरपालिकेत ऑनलाइन झालेल्या सभेत चिमणी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने झाले होते. काँग्रेसमधील नगरसेवकांनी चिमणी पाडू नका, अशी भूमिका घेतली. तर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सोलापूरला विमानसेवा नसल्याने विकास थांबला आहे, अशी भूमिका घेतली. तर दररोजची विमानसेवा नसल्याने सोलापूरचा विकास थांबला आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता कारखान्यात को जनरेशन प्लांट उभा केला आहे, असे याचिकाकर्ते डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.
तीन वेळा निविदा मंजूर -
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2012 साली बगॅसचा प्रोजेक्ट कामकाज सुरू केला होता. 2014 साली हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. याचवर्षी केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्टसिटीचा दर्जा दिला. त्याअनुषंगाने सोलापुरात स्मार्ट सिटीचे कामकाजदेखील सुरू झाले. सोलापूर शहराला डेली विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केला आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही यापूर्वीच चिमणी पाडा, असा निकाल दिला होता. चिमणी पाडण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दोन वेळा चिमणी पाडण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, आजतागायत ही चिमणी पाडली गेली नाही.
हेही वाचा -अल्पवयीन मुलीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या कंडक्टरला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड
औद्योगिक विकास थांबला -