महाराष्ट्र

maharashtra

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिल वाढली.. सोलापूर शहर व जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

By

Published : Jun 17, 2019, 9:22 PM IST

सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा आहेत. त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून, सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना टिळा लावून ओवाळताना शिक्षिका

सोलापूर - नवीन शैक्षणिक वर्षातील आज शाळेचा पहिला दिवस असल्याने सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुगे, चॉकलेट वाटून आणि टिळा लावून तर एवढेच नव्हे पेढे-लाडू वाटून या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याचवेळी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिल वाढली.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा आहेत. त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून, सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आले.

सोलापूर शहरातील अनेक शाळांत मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विडी घरकुल या कामगार वस्तीतल्या अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना टिळत लावत चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. कुमठा नाका येथील बालकामगार शाळेत जयहिंद फूड बँकेच्यावतीने शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचा चिमुरड्यांनी आनंद घेतला.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना टिळा लावून ओवाळताना शिक्षिका

अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे शाळेच्या पहिल्या दिवशी छान चॉकलेट्स आणि पेढ्याची भेट मिळाल्यामुळे त्यामुळे नव्याने शाळेत येणाऱ्या मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होण्यास मदत होईल. ज्यामुळे बालकामगार आणि अन्य कारणामुळे शाळेत येण्यास नकार देणाऱ्या शाळाबाह्य मुलांची संख्या कमी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details