सिंधुदुर्ग - उमेद ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे खासगीकरण करू नये आणि करार संपलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणू नये, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील बचत गटाच्या लाखो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, शासनाने उमेद अभियान एका खासगी कंपंनीला चालवायला दिले असून राज्याचे महसूल व ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
उमेद अभियान खासगी कंपनीच्या ताब्यात, अब्दुल सत्तारांचा सिंधुदुर्गात दुजोरा - सिंधुदुर्ग महिला बचतगट
सध्या राज्यात गाजत असलेल्या ‘उमेद’ अभियान खासगी कंपनीच्या हातात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याला राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दुजोरा दिला आहे. तसेच ‘उमेद’ची शंभर कोटीची बँक उभी करणार असल्याचे सूतोवाचही मंत्री सत्तार यांनी केले आहे.
![उमेद अभियान खासगी कंपनीच्या ताब्यात, अब्दुल सत्तारांचा सिंधुदुर्गात दुजोरा abdul sattar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:24:38:1604397278-mh-sindhudurg-5-abdul-sattar-10022-03112020131958-0311f-1604389798-628.jpg)
सध्या राज्यात गाजत असलेल्या ‘उमेद’ अभियान खासगी कंपनीच्या हातात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तशी माहिती दिली. तसेच ‘उमेद’ची शंभर कोटीची बँक उभी करणार असल्याचेही मंत्री सत्तार यांनी सांगितले. आंबोलीहून सावंतवाडीकडे येत असताना माडखोल येथील शाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान म्हणजेच उमेदकडून आयोजित केलेल्या प्रदर्शनाला मंत्री सत्तार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण बचत गटाची पाहणी केली. तसेच वेगवेगळ्या वस्तूही विकत घेत महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे कौतुक केले.
उमेद अभियान सुरू ठेवा, तसेच उमेदच्या कर्मचाऱ्यांना काढू नका अशा वेगवेगळ्या मागण्या बचत गटांच्या महिलांनीयावेळी केल्या. यावर मंत्री सत्तार यांनी तुम्ही उमेद अभियान खासगी कंपनीच्या ताब्यात देऊ नका, हे कशासाठी सांगता असा सवाल केला. त्यावर महिला गप्प बसल्या. तुम्ही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कमी करणार, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही सांंगितले असल्याचे महिलांनी सांगताच कर्मचाऱ्यांचे तुम्ही बघू नका बचत गटांच्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, तुमचा माल बाहेर कसा विक्री होईल हे बघा, बचत गटांना कुठेही धोका उद्भवणार नाही याची खात्री आम्ही देतो. मात्र आता उमेद अभियान खासगी कंपनीच्या ताब्यात गेले आहे. त्याला आम्ही काही करू शकत नाही. यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात, असेही मंत्री सत्तार म्हणाले.
उमेदची शंभर कोटींची बँक उभी करण्यात येणार असून, त्यातून सर्व कारभार चालणार आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.