सिंधुदुर्ग - गणेश चतुर्थीला कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या आरोग्याच्या काळजी सोबतच नियमांचे पालन करायचे आहे. या चाकरमान्यांचा प्रवेश सुखकर व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच संघटनेच्या मागण्यांचाही विचार केला जाईल. असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीत बोलताना व्यक्त केले.
शासनाच्या नियमाप्रमाणे चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. त्यांच्या कॉरंटाइनचा कालावधी कमी करता येईल का याबाबत राज्य शासन विचार करत आहे. यासोबतच आपण मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली आणि यावेळी काही मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातलेली आहे. असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.