महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता - मुख्यमंत्री - third wave of corona़

राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाचे परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

By

Published : Jun 25, 2021, 5:16 PM IST

सिंधुदुर्ग - राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाचे परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोरोना काळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत राखणे, ऑक्सिजन टँकची सुरक्षितता तपासणे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवणे, पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

'50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण'

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपुजन झाले तेंव्हा राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नव्हता. परंतू, आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पुर्णत्वाचे महत्व विशेषत्वाने जाणवते. गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'रुग्णालयाचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे'

अतिवृष्टी आणि वादळाला राज्य सामोरे गेले. या नैसर्गिक संकटात प्राणहानी होऊ नये आणि मालमत्तेचीही हानी टाळता यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. किनारपट्टी जिल्ह्यात हजारो लोकांना कोरोना नियमांचे पालन करत, सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ही सगळी परिस्थिती सिंधुदुर्गसह किनारपट्टी जिल्ह्यांनी यशस्वी हाताळली आणि या आव्हानांचा कुशलतेने सामाना केला. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे तसा तो यंत्रांवरही आहे. ही यंत्रेही चोवीस तास सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटनाही घडल्या, त्या टाळण्यासाठी विद्युत लाईन तपासून घेणे, रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. ती वीज तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

'दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता'

आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामाना केला. दुसरी लाट अजून ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन विषाणुचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे. भविष्यातही ती करू, पण याक्षेत्रातील तज्ज्ञांची उपलब्धता वाढवण्याला मर्यादा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details