सिंधुदुर्ग :या भागात अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. या आगीमध्ये तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर, सुंदर सावळ यांची काजू बागायती जळून खाक झाली. तसेच, सागवान, जांभूळ झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळवले त्यामुळे अन्य लोकांच्या बागा वाचल्या आहेत. दरम्यान, सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, निलेश मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी आग विजवण्याचे मोठे प्रयत्न केले. मात्र, बाग वाचली नाही.
बंब उपलब्ध झाला नाही :आग आगल्यानंतर लागलीच अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते. मात्र, सावंतवाडी, कुडाळ, मालवण नगरपालिकेकडून ते उपलब्ध झाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामा झाला नसल्याने अधिकृत नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. मात्र, 5 एकर मधील धारत्या काजू पाहता अंदाजे 20 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी आता हंगाम आलेलाल असतानाच हे नुकसान झाल्याने आमच्या तोंडातील घास गेला आहे अशी भावना व्यक्त करत येथील शेतकऱ्यांनी आपल्यालाला सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे.