सिंधुदुर्ग - हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. सत्ताधारी पक्ष आपली माणसे सांभण्याचं काम करत आहेत. आधी एकाने केले, आता शिवसेना करत असल्याचे सांगत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
संजय राठोड मंदिरात जायला संत आहेत का?
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतले जात होते. ते 15 दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? आरोपांना उत्तरे द्या, पळता कशाला, असा सवालही राणेंनी केला. तर सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसा परवाना दिला आहे का? असा प्रश्न करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
हेही वाचा -सरकारने वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, अन्यथा.. देवेंद्र फडणवीसांचा इशारा