सिंधुदुर्ग - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विद्यार्थ्यांच्या हिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये विचार मांडलेला आहे. येत्या काळात लवकरच परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जातील, हे आम्ही जाहीर करू, असे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
परीक्षेबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत - State exam issue
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परीक्षांसंबंधी निर्णय घेतला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
![परीक्षेबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत Uday samant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:56-mh-sindhudurg-145-decision-on-the-exam-will-be-announced-soon-10022-31052020232438-3105f-1590947678-524.jpg)
उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय सरकार घेईल. आगामी काळात लवकरच विद्यार्थांच्या परीक्षा कशाप्रकारे घेतल्या जातील, याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये, हा विचार करताना राज्य सरकार त्यांच्या आरोग्याचाही विचार करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.