महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिंत कोसळण्याप्रकरणी चौकशी होण्याआधीच पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात - Latest Sindhudurg news

पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि बांधकाम अधिकाऱ्यांनी भिंत कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. तर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र आज ठेकेदाराने कामाला सुरवात केली आहे.

भिंतीचे काम सुरू असल्याचे दृश्य
भिंतीचे काम सुरू असल्याचे दृश्य

By

Published : Jul 16, 2020, 6:53 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवलीत महामार्गाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीला बाहेरून आधार देण्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. कणकवलीत नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आंदोलन करत दर्जेदार काम करण्याची मागणी केली होती.

पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि बांधकाम अधिकाऱ्यांनी भिंत कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. तर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र आज ठेकेदाराने कामाला सुरवात केली आहे.

कणकवलीत उड्डाणपूल बॉक्सेलची संरक्षण भिंत कोसळल्यानंतर आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली शहरातील नागरिकांनी याठिकाणी वाय आकाराच्या पिलरच्या कामाची मागणी केली होती. हे काम होईपर्यंत कणकवली शहरात काम चालू देणार नाही, असा त्यांनी इशारा दिला होता.

या मागणीला दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला. गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात कणकवलीत काम सुरू करण्यात आले आहे. कणकवली सुपर बाजाराच्यासमोरील संरक्षण भिंत धोकादायक आहे. या भिंतीलाही बाहेरून आधार देण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धोकादायक भिंतीच्या बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक आणि वाहतूक पोलिसांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. गेले दोन दिवस हे काम होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांपैकी एकही पुढारी याठिकाणी फिरकला नाही.

काय घडली होती घटना?

घटनेची पाहणी सामंत यांनी केली. कणकवली शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी कणकवलीकर यांनी केल्या होत्या. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकारी आणि महामार्ग ठेकेदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून कामातील त्रुटी दूर करण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते. तरीही चौपदरीकरण कामात दर्जा राखण्यात आलेला नाही.

काय म्हणाले होते पालकमंत्री?

कणकवली शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याच्या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details