सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील कसाल ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. नरकासुर दहनाऐवजी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मिक शास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या हेतूने हा कार्यक्रमाचा उद्देश्य असल्याचे गजानन मुंज यांनी सांगितले. रविवारी दिवाळीच्या दिवशी पहाटे दिवशी सकाळी श्रीकृष्ण प्रतिमा फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका
सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन आणि नरकासूर दहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांचा छळ करणाऱ्या नरकासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले. याचा विसर पडलेला आहे. मात्र, काळाच्या ओघात ज्याचा वध केला, त्याच नरकासुराचा उदोउदो होताना दिसतो.