सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता झाले आहे. तीन खलाशांचे या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान देवगड येथील घटनेतील बेपत्ता खलाशांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या.. एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता - तौक्ते वादळ महाराष्ट्र
तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलेला असून मच्छिमार तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे दर्याला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. तर एका खलाशाचा मृत्यू झाला आहे.
एका खलाशांचा मृत्यू, तिघे बेपत्ता, तिघे बचावले -
तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम (रा. गढीताम्हणे, ता. देवगड) या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी (रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (रा. कोल्हापूर), प्रकाश गिरीद ( रा. राजापूर, रत्नागिरी) हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर ( रा.रत्नागिरी), विलास सुरेश राघव (रा. पुरळ - कळंबई, ता. देवगड), सूर्यकांत सायाजी सावंत, (रा. हुंबरठ, ता. कणकवली) हे सुखरूप बाहेर आले आहेत.