सातारा -आज सगळीकडे कोरोनाचे भय आहे. जीवाची शाश्वती नाही. मात्र, प्राण फक्त कोरोनामुळेच नाही तर भुकेनेही जाऊ शकतो. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे वाढत जाणारे लॉकडाऊन यात अनेक गोरगरीबांचे रोजगार बुडाले आहेत.
यातच येथील काही शाळकरी मुलांची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. ते म्हणाले, आधीच एक वेळच्या जेवणाची पंचायत होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे रोजगारही गेला. या सगळ्या परिणामांबद्दल अनेक वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने बातम्या छापून येत आहेत. वृत्तवाहिन्याही आपल्या चॅनेलवर अनेक बातम्या दाखवत आहेत. मात्र, 'आमचं ऐकण्याची मानसिकता कोणाची नाही का?' अशी सवाल येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या या संकटात शाळा सुरू करणे हे अत्यंत धोक्याचे आहे. मात्र, असे असले तरी जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवायचे असेल तर नियमांचे पूर्ण पालन करून शाळा सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अँड्रॉइड फोन, स्मार्टफोनची उपलब्धता आणि परिणामकारक पद्धतीने वापर हा जसा चिंतनाचा विषय आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण हे किती प्रमाणामध्ये परिणामकारक व प्रभावी असेल हाही चिंतनाचा विषय आहे.