महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashadhi wari 2023: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा रविवारी साताऱ्यात; तब्बल पाच दिवस असणार मुक्काम

आषाढी वारीत लहान थोर सर्वच सहभागी होत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. तब्बल पाच दिवस (दि. २३ जूनपर्यंत) पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे.

By

Published : Jun 17, 2023, 10:58 PM IST

Updated : Jun 18, 2023, 8:33 AM IST

Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi
माऊलींचा सोहळा

सातारा: महाराष्ट्रातील संतांची आळंदी ते पंढरपूर वारी विविध अंगी विविध दर्शन दाखवणारी असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती आणि संस्कार दाखवणाऱ्या या वारीमध्ये आता महिला सुद्धा पाठीमागे राहिल्या नाहीत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि. २३ जूनपर्यंत पालखी सोहळा तब्बल पाच दिवस सातारा जिल्ह्यात असणार आहे. रविवार (दि. १८) नीरा स्नानानंतर माऊलींचे जिल्ह्यात आगमन होईल. त्यानंतर पाच दिवस सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात मुक्काम असणार आहे.



पाडेगावात पालखी सोहळ्याचे स्वागत : पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर, रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहील. सोमवारी ( दि. १९) पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे. लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी (दि. २०) पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.


रविवारी पहिले रिंगण : रविवारी दुपारी चारच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर तरडगाव येथे ज्ञानेश्वर पालखीचा मुक्काम राहील. बुधवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता पालखी सोहळा फलटणकडे प्रस्थान करेल. दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबेल. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचा फलटण विमानतळावर मुक्काम आहे.



गुरूवारी सोहळ्याचे सोलापूरकडे प्रस्थान : फलटणमधून पालखी सोहळा गुरूवारी (दि. २२) बरडला प्रस्थान करेल. या मार्गावरील विडणी, पिंपरद, निंबळक फाटा येथे विसावा घेतल्यानंतर तो बरड मुक्कामी मार्गस्थ होईल. बरड मुक्कामानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करेल.



सातारा जिल्ह्यातील वाहतुकीत बदल: पालखी सोहळा दि. १८ ते २३ या दरम्यान जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

कोरोनानंतर पालखी सुरू : आषाढी वारी 11 जून ते 29 जून या काळात होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात आळंदी येथून 12 जूनला सुरूवात झाली. कोरोना काळात पालख्या, सोहळे स्थगित झाले होते. कोरोनानंतर पालखी सुरू झाल्याचे हे दुसरे वर्ष आहे. आषाढी एकादशी 29 जूनला आहे. भक्तगण अतिशय आनंदात असतात. आषाढी वारीनिमित्त ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हटला की, वारकरी अगदी प्रफुल्लित होतात.

हेही वाचा -

  1. Aashadhi Wari 2023 दिवे घाटात घुमला विठुमाऊलीचा गजर पहा ड्रोन व्हिडिओ
  2. Ashadhi Wari 2023 पाऊले चालती पंढरीची वाट फोटोतून पहा आषाढी वारी
  3. Pandharpur Vari पंढरपूर वारीनिमित्ताने भाविकांच्या सुविधेसाठी 21 कोटी रुपये देणार गिरीश महाजन
Last Updated : Jun 18, 2023, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details