सातारा -वाई एमआयडीसीमधील इंडस्ट्रीजमध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने दोन कामगार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते. या दोन बेपत्ता कामगारांपैकी एकाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळून आला. तर दुसऱ्याचा शोध वाई पोलीस घेत आहेत.
दुपारीच गेले होतो कामावरुन निघून -
वाई एमआयडीसीतील यश इंडस्ट्रीजमध्ये नरेश धर्मदासजी (वय २० रा.३२ ऐ इंदिरा झील सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट दिल्ली) आणि त्याचा मित्र बिरु श्रीपाल असे दोघेजण कामाला होते. पण इंडस्ट्रीजमध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने ते दोघेही दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते. संध्याकाळपर्यंत ते पुन्हा कंपनीत परत न आल्याचे कंपनीचे मॅनेजर रणजित बबन मंडले यांना सांगितले. त्यांनी सह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बेपत्ता कामगारांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
धोम कालव्यात मृतदेह -