महाराष्ट्र

maharashtra

शिवसेना-भाजपच्या चुकीच्या जागा वाटपामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे अशक्य - अमोल कोल्हे

By

Published : Oct 3, 2019, 5:54 PM IST

ठाकरे घराण्यातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यारूपाने वरळी मतदारसंघातून अर्ज दाखला केला. आता २४ तारखेलाच आदित्य ठाकरे यांचे काय होणार हे कळेल.

अमोल कोल्हे

पुणे - शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. यावर खासदार अमोल कोल्हे म्हणाले, राज्यात तरुण मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा व्यक्त करणे गैर नाही. मात्र, सध्या भाजप व शिवसेनेच्या चुकीच्या जागा वाटपामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. ते आंबेगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरेंवर दिलेली प्रतिक्रीया

हेही वाचा - जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित

राज्यात तरुणाईचे नेतृत्व उभे रहावे यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी संपुर्ण राज्यभरात जनआशिर्वाद यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांना तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार आहेत. मात्र, बुधवारीच आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीचा तगडा उमेदवार हा आदित्य ठाकरेंविरोधात देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - पुण्यात चंद्रकांत पाटीलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details