महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 11, 2019, 7:29 PM IST

ETV Bharat / state

साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण

11 डिसेंबर 1967 साली साताऱ्यात कोयना येथे झालेल्या भूकंपाला आज बुधवारी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही त्या काळरात्रीच्या जखमा येथील लोकांच्या मनात कायम आहेत.

koyana Earthquake fifty two years completed
सातारा येथील भुकंपाला ५२ वर्षे पूर्ण

सातारा -संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 11 डिसेंबर 1967 च्या प्रलयकारी भूकंपाला मंगळवार दिनांक 11 डिसेंबरला तब्बल 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या भुकंपाच्या उद्रेकामुळे कोयनानगर येथील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. येथील लोकांच्या मनात भूकंप म्हटले की आजही त्या 11 डिसेंबरची आठवण येते आणि मनात भीतीचे काहूर उठते.

हेही वाचा... Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

त्या दिवसाच्या आठवणींनी थरकाप उडतो. त्या प्रलयकारी भूकंपामुळे लोकांच्या मनावर झालेल्या जखमा आजही भरून निघाल्या नाहीत. 11 डिसेंबरची पहाट उजाडली की 1967 च्या आठवणीने मन सुन्न होते. कोयना परिसरातील भूकंपाचा तो 11 डिसेंबरचा दिवस आजही काळा दिवस म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत कोयना आणि परिसराने तब्बल दीड लाखांच्यावर भूकंपाचे धक्के पचविले असून येथील जनतेला जणू काही भूकंपाच्या धक्क्यांची सवयच झाली आहे.

हेही वाचा... आता बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट नाही तर वंदनीय, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 साली झालेल्या 6.7 रिश्टर स्केल तिव्रतेच्या विनाशकारी भूकंपाला 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या गेल्या 52 वर्षात येथे खूप काही घडून गेले. मात्र येथील भूकंपग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे अजूनही येथील भूकंपग्रस्तांच्या पदरी घोर निराशाच असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा... नाराज विनायक मेटेंनी भाजपकडे केली 'या' पदाची मागणी

11 डिसेंबर 1967 ला पाटण तालुक्याच्या विशेषत: कोयना परिसरात पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपल झाला. यात संपूर्ण कोयना भुईसपाट होवून शेकडो लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला. हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. हा विनाशकारी भूकंप संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असला तरी सर्वाधिक जीवित व वित्तहानी मात्र पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी शासकीय मालमत्ता, शैक्षणिक व औद्योगिक इमारती, ग्रामपंचायती, धर्मशाळा, देवालये, समाजमंदिरे, शेती, विहिरी, बंधारे यांचे अतोनात नुसान झाले. तसेच 199 गावठाणांना या भूकंपाचा तडाखा बसला होता. त्यात 34 हजार 934 कुटुंबांचे पूर्ण जीवन उद्‌ध्वस्त होवून 174 लोकांचे बळी गेले होते.

हेही वाचा... औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात

गेल्या 52 वर्षात कोयना, पाटण व कऱहाड तालुक्यात भूकंपाचे दीड लाखांच्यावर धक्के बसले आहेत. येथील ज्या बाधित गावांचे पुनर्वसन झाले आहे, तेथे ज्या नागरी सुविधा हव्यात त्या अजून मिळताना दिसत नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे कोयनावासियांना हक्काच्या सेवासुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. 11 डिसेंबरच्या प्रलयकारी भूकंपाची आठवण म्हणून प्रत्येकवर्षी 11 डिसेंबरला कोयनानगरमधील तीन मंदिरात कोयना प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व कोयना विभागातील जनता एकत्र येवून भूकंपात मृत पावलेल्यांना श्रध्दांजली वाहतात.

ABOUT THE AUTHOR

...view details