सांगली - क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. ही घटना सांगलीतील मिरजमध्ये घडली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
पवार गल्ली परिसरातील नदी वेस येथील मलगोंडा रायगोंडा पाटील (वय 61) यांचा पत्नी सुमन पाटील (वय 50) यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. मात्र, वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात त्यांनी पत्नीच्या डोक्यात खुरप्याचा वार करून त्यांची हत्या केली. पत्नी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर मलगोंडा पाटील यांनी घराला कुलूप घालून थेट मिरज पोलीस ठाणे गाठले आणि आपण पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.