महाराष्ट्र

maharashtra

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी मिळवले आबांच्या पेक्षा अधिक मताधिक्य

By

Published : Oct 24, 2019, 7:26 PM IST

सांगली जिल्ह्यातील तासगाव -कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमन आर आर पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी १ लाख २८ हजार ३७१ मत मिळवून विजय मिळवला.

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी मिळवले आबांच्या पेक्षा अधिक मताधिक्य

सांगली - तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमन आर आर पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आर आर आबांचा गड कायम राखला आहे. प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचा त्यांनी पराभव केला आहे.

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी राखला

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या निधनानंतर होणाऱ्या पाहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी विजय संपादन केला आहे. या मतदारसंघात त्यांना शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे आव्हान होते. घोरपडे यांच्या सोबतीला आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे तासगाव तालुक्याचे भाजप नेते व खासदार संजयकाका पाटील यांची मोठी ताकत होती. त्यामुळे ही निवडणूक अटी-तटीची झाली. कमी मताधिक्याने सुमनताई पाटील यांचा विजय होईल असे अंदाज व्यक्त करण्यात येते होते. मात्र, आर आर पाटील यांच्या आज पर्यंतच्या निवडणूकीत जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा अधिक मताधिक्याने या निवडणुकीत सुमनताई पाटील यांना मिळाले आहे. 1 लाख 28 हजार 371 तर अजितराव घोरपडे यांना 65 हजार 839 इतकी मते मिळाली आहेत. 62 हजार 532 इतक्या मताधिक्याने सुमनताई पाटील या विजयी झाल्या आहेत.

या निवडणुकीत प्रचाराची सर्व धुरा आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांभाळली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या भाषणांनी सभा गाजवत, मोठा विजय मिळवत रोहित पाटील यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवल्याची चर्चा सुरू आहे. या विजयानंतर रोहित पाटील याच्याशी बातचीत केली आहे, आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी .

ABOUT THE AUTHOR

...view details