महाराष्ट्र

maharashtra

शिराळा तालुक्यात धूळवाफ पद्धतीने भात पेरणीला सुरुवात

By

Published : May 28, 2021, 6:10 PM IST

शिराळा तालुक्याला भातपिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते. डोंगर कपारीतील उताराच्या शेती बरोबर नदीकाठच्या सखल शेतीमध्ये भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे शेतकरी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची पेरणी करत आहे.

भात पेरणीस सुरुवात
भात पेरणीस सुरुवात

सांगली -शिराळा तालुक्याला भातपिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते. डोंगर कपारीतील उताराच्या शेती बरोबर नदीकाठच्या सखल शेतीमध्ये भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे शेतकरी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची पेरणी करत आहे.

शिराळा तालुक्यात धूळवाफ पद्धतीने भात पेरणीला सुरुवात

अजूनही काही शेतात पावसाचे पाणी साचलेले

प्रत्येक वर्षी २० मेच्या दरम्यान भात पेरणी करण्यात येते. मात्र मध्यतंरी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धूळवाफ भात पेरणीस मशागत करुन तयार केलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पेरणीची कामे आठवडाभरापासून रखडली होती. दरम्यान आता पाऊस नसल्यामुळे शेताला वाफसा येऊ लागला आहे. त्यामुळे आता थोडया प्रमाणात पेरणीस सुरुवात झाली आहे. जमिनीत अजूनही ओलावा असल्यामुळे काही शिवारात माणसांनी कुरी ओढून पेरणी करण्यात येत आहे. अजूनही काही शेतात पावसाचे पाणी साचून आहे. अशा शेतातील पेरण्या आणखी लांबणार आहेत.

शेतकऱ्यांची बैलजोडया शोधण्यासाठी धावाधाव

शिराळा तालुक्यातील मांगले सागाव व पश्चिमेकडील भागात प्रत्येक वर्षी धुळवाफ पद्धतीने भात पेरणी करण्यात येते. जोरदार पावसाला सूरुवात होण्यापूर्वी सखल शेतातील भात पिकाची उगवण होते. मान्सूनच्या मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शेतकरी कोळपणी भांगलणीची आंतरमशागतीचीही कामे उरकून घेतात. मात्र चालूवर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात पडलेल्या वादळी पावसामुळे त्यामध्ये खंड पडला आहे. पेरणीची कामे रखडली गेली. दरम्यान सध्या पेरणीची धांदल सुरू झाली आहे. बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना बैलजोडया शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'

ABOUT THE AUTHOR

...view details