महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांची २८० कोटींची एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा - रघुनाथ पाटील

एकीकडे शेतकऱ्यांची कारखान्याकडील थकित देणी शासन वसूल करत नाही. पण शेतकऱ्यांची थकित देणी मात्र जबरदस्तीने वसूल केली जात आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांना खासदार, आमदार यांच्याकडून अभय दिले जात असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला.

By

Published : May 3, 2019, 4:34 PM IST

Updated : May 3, 2019, 9:19 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताना

सांगली- शेतकऱ्यांची २८० कोटी रुपयांची एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून तत्काळ थकाबाकी वसूल करून शेतकऱ्यांची थकित देणी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताना

ऊस गळाप हंगाम संपला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यात आलेली नाही. काही कारखाने वगळता जवळपास सर्वच कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. थकित एफआरपी देण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर जप्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कारवाई होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली.

एकीकडे शेतकऱ्यांची कारखान्याकडील थकित देणी शासन वसूल करत नाही. पण शेतकऱ्यांची थकित देणी मात्र जबरदस्तीने वसूल केली जात आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांना खासदार, आमदार यांच्याकडून अभय दिले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

आज जिल्ह्यातील काही साखर कारखाने वगळता इतर कारखान्यांकडून २८० कोटी रुपयांची एफआरपी थकित असून ती कायद्याप्रमाणे देणे बंधनकारक आहे. कायदा मोडणाऱ्यांवर जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून कारवाई करण्याची जबाबदारी असल्याचे मत रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी ८ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Last Updated : May 3, 2019, 9:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details