अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - संजयकाका पाटील - सांगलीत अवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अन्यथा सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे.

sanjay patil
सांगली -अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सांगलीचे भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अन्यथा सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर पीक विमा व शेतकरयांच्या नुकसानीबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय काका पाटील
गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. गेल्या 2 वर्षांपासून महापूर, कोरोना, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा अवकाळीचा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवी तसेच तात्काळ शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे व्याज माफी करून पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अशी मागणीही खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे.
Last Updated : Dec 5, 2021, 8:40 PM IST