महाराष्ट्र

maharashtra

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - खासदार संजयकाका पाटील

By

Published : Aug 18, 2019, 8:52 AM IST

पूर ओसरला आहे. लोक आपल्या घरी आता परतले आहेत. मात्र, पूरग्रस्तांना मदत मिळण्यामध्ये काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या निकषाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, घरांचे नुकसान याबाबतीत शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात वाढ व्हावी यासह अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष भेटून करणार असल्याचे संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच्या अडचणी व वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - खासदार संजयकाका पाटील

सांगली - जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीमध्ये, शासकीय पातळीवर निर्माण होणाऱ्या अडचणी आणि मदत वाढवून मिळण्याबाबत येत्या २ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. घर पडलेल्या पूरग्रस्तांना तात्पूरते शेड किंवा भाड्याने राहण्याची सोय करण्याची मागणीही करणार असल्याचे त्यानी सांगीतले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच्या अडचणी व वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - खासदार संजयकाका पाटील

पूर ओसरला आहे. लोक आपल्या घरी आता परतले आहेत. मात्र, पूरग्रस्तांना मदत मिळण्यामध्ये काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या निकषाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, घरांचे नुकसान याबाबतीत शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात वाढ व्हावी यासह अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून करणार असल्याचे संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले.

शेती, जनावरे अशा सर्वच पातळ्यांवर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल साडेतीन हजार कोटींच्या आसपास अंदाजे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्याला या महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांनीच सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांना अनेक विमा कंपनीकडून जाचक निकष लावण्यात येत आहेत. मात्र, विमा कंपन्यांनी पूरग्रस्त व्यापार्‍यांच्या बाबतीत जाचक निकष लावू नयेत आणि ते योग्य होणार नाही. असे स्पष्ट करत व्यापाऱ्यांनाही सरकारकडून कशा पद्धतीने अधिकची मदत मिळवून देता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार संजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ज्या पूरग्रस्तांची घरे पडलेत किंवा पडण्याच्या स्थितीत आहेत, अशा पूरग्रस्तांचे तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून पुनर्वसन करणे किंवा त्यांची भाड्याने राहण्या बाबतीत मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून कोयना धरण, राज्य सरकार आणि कर्नाटक सरकार, अलमट्टी धरण प्रशासन यांच्यामध्ये समन्वय कशा पद्धतीने ठेवता येईल यासाठी ही लवकरच एक व्यापक बैठक घेतली जाईल, असेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details