महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुढील काळात कोणतेही सरकार आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही - जयंत पाटील - ayushman bharat Urban Health Center Miraj

गेल्या सात महिन्यात कोरोना संकटकाळात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य केंद्रे किती महत्त्वाची आहेत हे भारतीय समाजाला, त्याचबरोबर देशाला आणि संपूर्ण जगालासुद्धा कळले आहे. त्यामुळे, यापुढील काळात आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, आणि केंद्र असो व राज्य सरकार, हे यापुढे आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्री  जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील

By

Published : Oct 25, 2020, 6:09 PM IST

सांगली- या पुढील काळात कोणतेही सरकार आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोरोना संकटात आरोग्य केंद्राचे महत्त्व भारतीय समाजालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळले आहे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. मिरज येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

माहिती देतान मंत्री जयंत पाटील

मिरजेतील अंकली रोडवर महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान भारत शहरी आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह मिरजेतील नगरसेवक उपस्थित होते.

गेल्या सात महिन्यात कोरोना संकटकाळात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य केंद्रे किती महत्त्वाची आहेत हे भारतीय समाजाला, त्याचबरोबर देशाला आणि संपूर्ण जगालासुद्धा कळले आहे. त्यामुळे, यापुढील काळात आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, आणि केंद्र असो व राज्य सरकार, हे यापुढे आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे आणि शाळा या सुसज्ज व अद्ययावत करण्यासाठी यापुढील काळात आपला प्रयत्न राहील, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-कर्नाटकच्या गुटका व्यापाऱ्याला सांगलीत अटक, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details