सांगली - कृष्णा नदीने अखेर धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोका पातळी 45 फूट इतकी आहे. मात्र, सध्या कृष्णेची पाणी 49 फूट इतकी पातळी झाली आहे. त्यामुळे कृष्णेच्या पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौक आणि मारुती चौक याठिकाणी पुराचे पाणी पोहोचले आहे. त्याचबरोबर पूरपट्ट्यातील आणखी भागातील शेकडो घरे पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेकडो गावेही पाण्याखाली गेले आहेत.
पुराचे पाणी शिरले बाजारपेठेत -
संततधार पाऊस कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीला पूर आला आहे. आज सकाळी कृष्णा नदीने सांगलीतील धोका पातळी ओलांडली आहे. 45 फूट ही धोका पातळी असून 9 वाजता कृष्णेची पाणी पातळी ही 49 फूट झाली आहे. तर कृष्णेच्या पुराचे पाणी आता नागरी वस्तीबरोबर शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. शुक्रवारी मगरमछ कॉलनी, दत्त नगर, काका नगर आणि सूर्यवंशी प्लॉट याठिकाणी असणारे घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 150 हुन अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर शनिवारी पुराचे पाणी हे शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. टिळक चौकपासून हरभट रोडपर्यंत तसेच मारुती चौकपासून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरातील दुकानांपर्यंत पुराचे पाणी येऊन पोहोचले आहे.
पुराच्या धास्तीने नागरिकांचे स्थलांतर सुरू -