महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेचे सांगलीत धरणे - शरद जोशी प्रणित संघटनेचे धरणे आंदोलन

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेले नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले

By

Published : Sep 3, 2019, 6:29 PM IST

सांगली -पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेले नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले


कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, हळद, भुईमूग अशा अनेक पिकांचे महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक हेक्टर पर्यंत जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी केली आहे.
या निर्णयावर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दोन, तीन, चार, पाच हेक्टरपर्यंत जमिनी आहेत. त्यामुळे एक हेक्‍टरपर्यंतच पीक कर्ज माफी करणे शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने सरकारवर केला आहे.

हेही वाचा -सांगलीत गणपती पंचायतनचा यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार


पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने नुकसान भरपाईचे लावलेले निकष बदलावेत, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज द्यावे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार कै.शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख संजय कोले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

ABOUT THE AUTHOR

...view details