महाराष्ट्र

maharashtra

रत्नागिरी जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध

जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या 479 ग्रामपंचायतींसाठी 3 हजार 921 जागांसाठी 7 हजार 194 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 1 हजार 49 जणांनी माघार घेतल्याने 1 हजार 818 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

By

Published : Jan 7, 2021, 12:16 AM IST

Published : Jan 7, 2021, 12:16 AM IST

Unopposed elections gram panchayats in Ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध

रत्नागिरी-जिल्ह्यात एकूण 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र यापैकी तब्बल 119 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे एकूण 1818 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 360 ग्रामपंचायतींमधील 2 हजार 109 जागांसाठी 4 हजार 327 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धुरळा गावोगावी उडणार आहे.

1818 उमेदवार बिनविरोध

जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या 479 ग्रामपंचायतींसाठी 3 हजार 921 जागांसाठी 7 हजार 194 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 1 हजार 49 जणांनी माघार घेतल्याने 1 हजार 818 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

सर्वाधिक बिनविरोध निवडणुका खेडमध्ये

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेसकडून जोरदार प्रयत्न झाले. दरम्यान खेड तालुक्यात सर्वाधिक 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याखालोखाल चिपळूणमध्ये 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती बिनविरोध -

  • मंडणगड - 2
  • खेड - 23
  • दापोली - 15
  • चिपळूण - 22
  • गुहागर - 13
  • संगमेश्वर - 19
  • रत्नागिरी - 12
  • राजापूर - 9
  • लांजा - 4

हेही वाचा - औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details