रत्नागिरी - जगबुडी नदीची पाणीपातळी वाढल्याने जगबुडी पुलावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महामार्ग बंद करण्यात आला होता.
मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प; जगबुडी पुलावरील वाहतूक सकाळपासून बंद
मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली आहे.
जगबुडी पुलावरील वाहतूक सकाळपासून बंद आहे
जगबुडी नदीतील पाणी ओसरल्याने सकाळी साडेआठ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरू झाली होती. मात्र, पुन्हा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी 7 मीटर आहे. सध्या नदीची पाणीपातळी 8.40 मीटर झाली आहे. त्यामुळे आज (शनिवार) सकाळी साडेदहा वाजता जगबुडी पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता देखील जगबुडी नदीची पाणीपातळी 8.50 मीटर इतकी होती. त्यामुळे वाहतूक बंदच आहे.
Last Updated : Aug 3, 2019, 10:28 PM IST