महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2020, 5:26 PM IST

Updated : Feb 1, 2020, 8:55 AM IST

ETV Bharat / state

खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप, जिल्हाधिकार्‍यांनी साधला संपर्क

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे.

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस

रत्नागिरी - चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील तीन मुलींचा समावेश आहे. या मुली खेड तालुक्यातील असून चीनमधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत. दरम्यान या तिन्ही विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यातील एका विद्यार्थिनीशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. यावेळी या विद्यार्थीनी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.

खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप

हेही वाचा... चीनमधील भारतीयांना 'एअरलिफ्ट' करण्यासाठी विशेष विमान आज होणार रवाना..

विद्यार्थिनींपैकी सादिया बशीर मुजावर हिच्याशी त्यांनी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदुले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत.

हेही वाचा... चीनमधील आपल्या नागरिकांना पाकिस्तान मायदेशी आणणार नाही!

सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. या तीन जणी त्यामुळे घरातच आहेत.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीनमधील भारतीय दूतावासासोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू , असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केले.

Last Updated : Feb 1, 2020, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details