महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 2 जून ऐवजी 3 जूनपासून कडक लॉकडाऊन; वाचा नवी नियमावली - June 3 Lockdown Ratnagiri

जिल्ह्यात २ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते, मात्र नागरिकांना ४८ तास आधी कल्पना द्यावी व त्यांना किराणा व अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी संधी मिळावी म्हणून ३ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दिले.

Strict lockdown order Ratnagiri Collector
कडक लॉकडाऊन आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी

By

Published : Jun 1, 2021, 7:46 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात २ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते, मात्र नागरिकांना ४८ तास आधी कल्पना द्यावी व त्यांना किराणा व अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी संधी मिळावी म्हणून ३ जूनपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दिले. हा लॉकडाऊन ३ ते ९ जून या कालावधीत राहील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

काय बंद काय सुरू

1. मेडिकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. तथापि, या आस्थापनांमधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकीय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. या व्यतिरिक्त किराणा मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना पूर्णत: बंद राहतील. केवळ दुध विक्री घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत करता येईल.

हेही वाचा -आजपासून यांत्रिक मासेमारी 2 महिने बंद, कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या

2. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतून प्रवेश करणे किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास बंद करण्यात येत आहेत. तथापि, केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैदयकीय उपचारासाठी व कोविड -19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या/आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा राहील.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र/पोलीस विभागाकडील ई-पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

3. सर्व प्रकारची शासकीय व खासगी सार्वजनिक वाहतूक बंद राहील. केवळ आपत्कालीन परिस्थितीत त्यांना प्रवासी वाहतूक करता येईल.

4. सर्व प्रकारच्या बँका/वित्तीय संस्थांचे कामकाज बंद राहील. तथापि, केवळ शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीक कर्ज व त्या अनुषंगिक बाबींच्या कामकाजासाठी 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत बँका/वित्तीय संस्था सुरू राहतील.

5. सर्व प्रकारचे अत्यावश्यक नसणारे उद्योग व त्यांच्या आस्थापना बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तुंची निर्मिती/उत्पादन/ पुरवठा करणारे उदयोग/आस्थापना सुरू राहतील. कामगारांची वाहतुकीची व्यवस्था संबंधित कंपनीने करणे आवश्यक राहील.

6. सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.

7. सर्व पेट्रोल पंप हे केवळ अत्यावश्यक वाहतुकीसाठी सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 या कालावधीत सुरू राहतील. तथापि, मालवाहतुकीच्या वाहनांना पेट्रोल भरण्यासाठी वेळेचे बधंन राहणार नाही.

8. मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि, अशी मालवाहतूक केवळ दुकानापर्यंत/ आस्थापनेपर्यंत माल वितरण करण्यापूरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरविता येणार नाही. याबाबत शर्तभंग आढळल्यास अशा मालवाहतूकदाराची सेवा कोविड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येईल.

9. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषीविषयक संलग्न बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची अवजारे व त्यांच्या दुरुस्ती संबंधीची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरू ठेवण्या मुभा राहील.

10. अत्यावश्यक व आपत्कालीन शासकीय यंत्रणा, तसेच अन्य शासकीय कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15 टक्के एवढया कर्मचारी संख्येसह सुरू राहतील.

11. शिवभोजन थाळी योजनेत फक्त पार्सल सुविधा सुरू राहील.

12. सदर आदेशात नमुद नसलेल्या बाबी त्यांना जोपर्यंत विशेष आदेशान्वये सुट दिली जात नाही तोपर्यंत बंद समजण्यात याव्यात. यापूर्वीच्या सर्व आदेशान्वये निर्गमित केलेले सर्व निर्बंध दंडाच्या तरतुदींसह लागू राहतील. सदरचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) लागू राहील. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी 2 जून, 2021 रोजी रात्री 12.00 वाजतापासून ते 9 जून, 2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्हा 2 जूनपासून आठ दिवस लॉकडाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details