महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलीस सज्ज - डॉ. प्रवीण मुंढे

लोकशाहीच्या उत्सवात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील जिल्ह्यात शांततेत पार पडेल, असा विश्वास डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. 90 पेक्षा जास्त रुटमार्च काढण्यात आले. तसेच महत्वाचे गुन्हेगार किंवा रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. काहींना तडीपार करण्यात आलेले आहे.

By

Published : Oct 20, 2019, 7:34 PM IST

Updated : Oct 20, 2019, 7:44 PM IST

पोलीस पथसंचलन रत्नागिरी

रत्नागिरी - निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 1250 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मदतीला राज्यातील इतर 600 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच 1300 होमगार्ड आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या पाच तुकड्या तैनात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

लोकशाहीच्या उत्सवात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील जिल्ह्यात शांततेत पार पडेल, असा विश्वास डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. 90 पेक्षा जास्त रुटमार्च काढण्यात आले. तसेच महत्वाचे गुन्हेगार किंवा रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. काहींना तडीपार करण्यात आलेले आहे. एकूणच आम्ही केलेल्या नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री आहे, पण अनुचित प्रकार घडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी, आयोगाचा भोंगळ कारभार

जिल्ह्यात एकही संवेदनशील केंद्र किंवा गाव नसल्याचे डॉ. मुंढे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भयमुक्त आणि कोणत्याही अवैध प्रभावाविना समोर येऊन लोकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहनही मुंढे यांनी केले आहे. दरम्यान, याचसंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

हेही वाचा - राहुल गांधींनी साधला पीयूष गोयल यांच्यावर निशाणा, म्हणाले...'हे धर्मांध लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत'

Last Updated : Oct 20, 2019, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details