'रत्नागिरी शहरातील गॅस, पाणी पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा'
शहरात गॅस आणि पाईपलाईनसाठी खणण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे केली आहे. खणलेले डब्बर आणि माती रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्थ पडलेले असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरी - शहरात गॅस आणि पाईपलाईनसाठी खणण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी शहरात सध्या गॅस आणि पाणी पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खणण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी खणलेल्या रस्त्यांवर नुसती माती ओढली असून व्यवस्थित भराव करण्यात आलेला नाही. खणलेले डब्बर आणि माती रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्थ पडलेले असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.