महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीला कोरोना निर्बंधातून शिथिलता; बुधवारी अंतिम निर्णय - रत्नागिरीत कोरोना निर्बंधातून शिथिलता

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. तसेच ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात सामावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत सोमवारी झालेली बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहेत.

relaxation from covid principle in Ratnagiri
रत्नागिरीत कोरोना निर्बंधातून शिथिलता

By

Published : Jun 22, 2021, 11:43 AM IST

रत्नागिरी -जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली असून बुधवारी यावर अंतिम निर्णय होईल. अशी दिलासादायक माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार राजन साळवी हेदेखील उपस्थित होते.

रत्नागिरीत कोरोना निर्बंधातून शिथिलता; माहिती देतांना उदय सामंत

निर्बंधामध्ये मिळणार शिथिलता -

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. तसेच ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात सामावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत सोमवारी झालेली बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. कशात किती सवलत दिली जाईल हे जिल्हाधिकारी जाहीर करतील, अशी दिलासादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. मात्र निर्बंध शिथिल केले आणि बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी प्रादूर्भाव रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तिसरी लाट येऊच नये - उदय सामंत

दरम्यान तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील, दुसऱ्या लाटेत तरुण तर तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरीत १७३ बेडची लहान मुलांची तीन कोविड संटेर तयार करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या करमनुकीची, शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यामध्ये आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च केले आहेत. आमची परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, या कोविड सेंटरचा उपयोग नाही झाला तरी चालेल. आमचा निधी फुकट जाऊ दे पण तिसरी लाट येऊच नये, असेही मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे नवे २१ रुग्ण; रत्नागिरीत सर्वाधिक आढळले रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details