महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

15 तासानंतर रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

By

Published : Jul 27, 2019, 3:08 PM IST

जगबुडी पूल

रत्नागिरी- येथील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शुक्रवारी रात्री 8 वाजता जगबुडी पुलावरील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.

15 तासानंतर रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू

आज जगबुडी नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी 11:15 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details