रत्नागिरी- येथील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शुक्रवारी रात्री 8 वाजता जगबुडी पुलावरील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.
15 तासानंतर रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू - Ratnagiri
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
![15 तासानंतर रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3960506-thumbnail-3x2-bridge.jpg)
जगबुडी पूल
15 तासानंतर रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू
आज जगबुडी नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी 11:15 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.