महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

सकाळी साडेदहापासून बंद असलेली जगबुडी पुलावरील वाहतूक अंशत: सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूकसाठी खुला करण्यात आला आहे.

By

Published : Aug 3, 2019, 9:53 PM IST

जगबुडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

रत्नागिरी- जगबुडी पुलावरून शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग अंशत: खुला झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सकाळी साडेदहा वाजता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. मात्र, आता पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल १० तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत सकाळचे 2 तास वगळता 19 तास जगबुडी पुलावरील वाहतूक बंद होती.

ABOUT THE AUTHOR

...view details