रत्नागिरी :कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ अत्यंत पुचाट वृत्तीचे ( Vinayak Raut Criticized Cabinet of Maharashtra ) आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज राज्य सरकारवर केली आहे, ते आज रत्नागिरीत बोलत ( MP Vinayak Raut Today Criticized on State Government ) होते. यावेळी विनायक राऊत म्हणाले, कर्नाटकच्या विधानसभेने ताबडतोब ठराव केला आणि आपल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आधी दिल्लीवारी केली. दिल्लीकरांशी लोटांगण घातले ( Karnataka Legislative Assembly Immediately Passed Resolution ) आणि आता येऊन कर्नाटकच्या विरोधात ठराव केला. विरोधी पक्षांनी जर नेटा लावला नसता, तर या सरकारने तो ठराव मांडला पण नसता अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.
'या' सर्व नेत्यांचे भ्रष्टाचार आता बाहेर येणारदरम्यान अब्दुल सत्तार, संजय राठोड किंवा उद्योग मंत्री उदय सामंत या सर्व नेत्यांचे भ्रष्टाचार आता बाहेर येताहेत. सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी केला आहे, त्यांना जनतेच्या न्यायालयात जावे लागेल. पण, त्यांना खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची आवश्यकता आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.