महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर - ratnagiri latest ganesh festival news

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी
रत्नागिरी

By

Published : Aug 7, 2020, 2:42 PM IST

रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसच्या व्यवस्थेबाबत, चेकपोस्टवर करण्याच्या कार्यवाहीबाबत, स्क्रिनिंग सेंटरवर करावयाची कार्यवाही, ग्राम/वाडी/नागरी कृती दल यांनी करावयाची कार्यवाही, सीसीसीबाबत करावयाची कार्यवाही यासंबधित मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

नागरी कृती दल आणि ग्राम कृती दल यांना गणेशोत्सव काळात अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवरील नायब तहसीलदार , विस्तार अधिकारी , बीट अंमलदार , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , तलाठी , पोलीस पाटील , सरपंच यांची बैठक घेऊन या कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सूचना द्याव्या, गावागावातून , वाडी वस्तीवर हॅन्डबील , फ्लेक्स , बोर्ड लावावे.

होम क्वारंटाईन व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडता कामा नये, ही गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त जागृती करावी. नागरी कृती दलाने नगरसेवकांचे मार्गदर्शनाखाली जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे. नगरपरिषदेने पदाधिकाऱयांची बैठक घ्यावी. तसेच पोलीसांनी पोलीस मित्रांची मदत घ्यावी.

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाने स्पष्ट परिपत्रक काढले आहे. सर्व यंत्रणांनी, नोडल अधिकाऱयांनी परिपत्रकातील सुचनानुसार कार्यवाही करावी आणि उत्सव काळात भांडण तंटे होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

गणेशोत्सव काळात बाहेरुन येणाऱया लोकांच्या बाबतीत ज्या मार्गदर्शन सुचना आहेत, त्यांचे तंतोतंत पालन यंत्रणांकडून होणे बंधनकारक आहे. तहसीलदारांनी आगार व्यवस्थापकांकडून प्राप्त झालेली यादी ग्रामकृती दलाकडे पाठवावी. जेणेकरुन येणाऱया लोकांची संख्या आणि नावे कृती दलाला समजू शकेल आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे सुलभ होईल. कृती दलांना जास्तीत जास्त कार्यान्वीत होण्याबाबत सूचना देण्यात याव्या.

गावात येणाऱया प्रत्येकावर लक्ष देण्यास सांगावे. काही गावांतील ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने तिथे प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. अशा ठिकाणी तलाठी किंवा ग्रामसेवक यांना कृतीदलाचे अध्यक्ष नेमावे व त्याप्रमाणे लेखी आदेश पारीत करावे. दुप्पट- तिप्पट स्क्रिनिंग सेंटर सुरु करावे. रिकाम्या शाळा , हॉल , मोकळे मैदान याचा शोध घ्यावा. मोकळया मैदानात व्यवस्था करावी, आशा सूचना ग्राम/ वाडी/नागरी कृतीदल यांना देण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details