महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2020, 8:28 PM IST

ETV Bharat / state

नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नातेवाईक, निलेश राणेंचा खळबळजनक आरोप

घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाची कंपनी असून या 'सुगी डेव्हलपर्स' कंपनीचे संचालक निशांत देशमुख यांनी १४०० एकर जागा परप्रांतियांना विकली आहे. जमीन घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले असून सुरुवातीला विरोध आणि नंतर रत्नागिरीवासीयांना लुटायचे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी - जिल्ह्यातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. जागेच्या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाची कंपनी असून या 'सुगी डेव्हलपर्स' कंपनीचे संचालक निशांत देशमुख यांनी १४०० एकर जागा परप्रांतियांना विकली आहे. जमीन घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले असून सुरुवातीला विरोध नंतर रत्नागिरीवासीयांना लुटायचे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बुधवारी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेने प्रकल्पाला प्रथम विरोध केला आता यांच्या आशीर्वादाने परप्रांतीय या कोकणात घुसलेत, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, मुंबईतील सुगी डेव्हलपर्स या कंपनीत मुख्यमंत्री ठाकरे यांचे मावसभाऊ निशांत देशमुख संचालक आहेत. राजापूर येथे या कंपनीचे कार्यालय होते. कोदवली येथील अ‌ॅड. कावतकर यांनी या कंपनीमार्फत सुमारे १४०० एकर जागेचा व्यवहार परप्रांतियांसोबत केला. स्थानिकांची जागा परप्रांतियांच्या नावावर करून दिली आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत हे व्यवहार पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या व्यवहारांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा पाठिंबा होता का? अशी शंका निर्माण झाल्याचे राणे यांनी सांगितले.

हेही वाचा -रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर; गणपतीपुळेत घरावर झाड कोसळलं, जीवितहानी नाही

पुणे येथील ऋचा डेव्हलपर्स या कंपनीने ९०० एकर जागेचा व्यवहार परप्रांतियांसोबत केला. यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. तर विभागप्रमुख तथा राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती कमलाकर कदम यांनी ३६ एकर जागेवर स्वतःचे नाव कूळ म्हणून लावून जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्यवहार न्यायप्रविष्ट झाल्याने संबंधितांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. खरेदी-विक्रीसाठी बंदी असलेल्या हिस्सा नं.६८/३ ते हिस्सा नं.६८/८ या जागेची विक्री शिवसैनिकांनी परप्रांतियांना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपण सरकारकडे केली आहे. परंतु, सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आपण न्यायालयात जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

हेही वाचा -'शिवसेना म्हणजे धगधगते अग्नीकुंड, नादाला लागाल तर संपून जाल'

ABOUT THE AUTHOR

...view details