महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2021, 10:27 PM IST

Updated : Feb 17, 2021, 3:22 PM IST

ETV Bharat / state

...तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत - निलेश राणे

माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रहार केला आहे. निलेश राणे यांचा आज रत्नागिरीत भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी- भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रहार केला आहे. निलेश राणे यांचा आज रत्नागिरीत भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको का? आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, शपथ घेतो उपमुख्यमंत्री पदाची, आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो. त्यांंच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार यांच्यासोबत उभे केले जाते, तोच माणूस भाजपवर टिका करतो आणि आपण सहन करायची का? असा सवाल करत माजी खासदार निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

रत्नागिरी
तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीतयावेळी बोलताना राणे म्हणाले की, फडणवीस साहेब खरोखरच खूप चांगले आहेत, शपथविधीच्या वेळी काय काय घडले ते अजून सांगत नाहीत, एकदा सांगितले ना, तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत, असे सांगत निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
Last Updated : Feb 17, 2021, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details