रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडीत ही घटना घडली आहे.
आत्माराम बेंद्रे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या ५० फूट खोल विहिरीत पडला आणि जोरजोरात ओरडू लागला. ग्रामस्थांनी बिबट्याचा आवाज ऐकून विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.