महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार; राजापूर बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी

पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत शिरले आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

By

Published : Jul 30, 2019, 9:49 AM IST

पुराचं पाणी

रत्नागिरी- पावसाचा जोर कायम असल्याने राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत शिरले आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजल्यापासून जव्हार चौकात पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राजापूर नगर परिषदेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले.

राजापूर बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी

जवाहर चौक परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपलं सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या जव्हार चौकात तीन ते चार फुटापर्यंत पाणी आहे. त्यांमुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राजापूरचे नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली

ABOUT THE AUTHOR

...view details