रायगड -आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी रविवारी अलिबाग येथे 'सक्षम फिट इंडिया वॉकथॉन रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. ओएनजीसी आणि सुरभी स्वयंसेवी संस्थेमार्फत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ओएनजीसीचे अधिकारी वी. के. महेंद्रु यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी इंधन बचतीबाबत पथनाट्यही सादर करण्यात आले. या रॅलीत ओएनजीसी अधिकारी, कॉलेज विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, बचत गट महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी इंधन बचतीची प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली.
नागरिकांनी चालत दिला इंधन बचतीचा संदेश हेही वाचा -आंबेत पूल वाहतुकीसाठी होणार बंद, पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत
जगातिक वातावरणात बदल झाला असून वाढत्या प्रदूषणाचा त्रास हा सर्वांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात वाढत्या वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे वातावरणावर परिणाम होत असून इंधनाचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहनाचा वापर कमी करून चालणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन इंधन बचतही होणार आहे. याबाबतची जनजागृती नागरिकांना व्हावी, यासाठी वॉकथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा -अलिबागमधील शाहबाज गावचे शेतकरी वळतायत मत्स्य शेतीकडे
अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. रायगड बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारुती नाका, समुद्र किनारा अशी रॅली काढण्यात आली. समुद्रकिनारी रॅलीचे विसर्जन झाले. यावेळी इंधन बचतीच्या घोषणा रॅलीत सहभागी झालेल्यांनी दिल्या.