रायगड -राज्यात सर्वत्र परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. रायगड जिल्हा देखील याला अपवाद नसून, येथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबतचे निवेदन दिले.
हेही वाचा... जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानी दिली मायेची उब
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या सोईसुविधांबाबत या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तकांची भेट घेत त्यांनाही निवेदन दिले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील यांचा समावेश होता.
हेही वाचा... देशभरातील बीएसएनएल कर्मचारी संघटनांचे आज उपोषण
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतीचे नुकसान झाले. हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. त्यामुळे शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.