महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू मात्र पालकसभा न झाल्याने अनेक वर्ग रिकामे - raigad parents news

कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू झाल्या असल्यातरी अनेक शाळेत पालकसभा झाल्या नसल्याने आज शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसत होती.

raigad
raigad

By

Published : Jan 27, 2021, 3:21 PM IST

Updated : Jan 27, 2021, 4:13 PM IST

रायगड - शासनाने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे कोरोनाचे नियम पाळून वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आज (27 जानेवारी)पासून जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. विद्यार्थीही आठ महिन्यानंतर शाळेत दाखल झाल्याने तेही आनंदित आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू झाल्या असल्यातरी अनेक शाळेत पालकसभा झाल्या नसल्याने आज शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसत होती.

अनेकांचे रिपोर्ट येणे बाकी

जिल्ह्यात 894 शाळेत 31 हजार 912 विद्यार्थी आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळेचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 894 पाचवी ते आठवीच्या शाळा आहेत. यामध्ये 31 हजार 912 विद्यार्थी आहेत. 915 शिक्षक असून त्याची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे. मात्र अनेकांचे रिपोर्ट आलेले नसल्याने अद्याप काही शाळा सुरू झालेल्या नाहीत.

प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी

शाळा केल्या सॅनिटाइझ, तपासणी करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या आहेत. याआधी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व शाळा, वर्ग हे सॅनिटाइझ करण्यात आल्या आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून सॅनिटाइझ देऊन वर्गात प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी असे 25 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मास्क लावूनच शाळेत प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थी आनंदित

दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी प्रत्यक्ष शिकण्यात आनंद असतो. तसेच दहा महिन्यानंतर मित्र-मैत्रिणी भेटल्याने विद्यार्थीही आनंदित झाले आहेत.

Last Updated : Jan 27, 2021, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details