महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्यार चक्रीवादळाचा श्रीवर्धनच्या किनारपट्टीला फटका - kyarr cyclone affected shrivardhan coast

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. यामुळे रायगडच्या किनाऱ्यावर उसळलेल्या लाटांचा फटका किनाऱ्याजवळ असलेल्या मच्छीमारांना बसला आहे.

क्यार चक्रीवादळाचा श्रीवर्धनच्या किनारपट्टीला फटका

By

Published : Oct 26, 2019, 3:06 PM IST

रायगड -अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळ तयार झाले असून याचा फटका जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हजारो मासेमारी बोटी समुद्रकिनारी विसावल्या आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनारीही शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत.

हेही वाचा... क्योर चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा

कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. क्यार चक्रीवादळाचा श्रीवर्धनच्या किनाऱ्याला फटका बसला असून अनेक बोटींमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांची धावाधाव सुरू झाली आहे. समुद्राचे पाणी घुसले असले तरी अद्याप तरी कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

हेही वाचा... परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादनात घट... शेतकऱ्यांना आर्थिक फटका

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details