महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 21, 2021, 1:08 PM IST

ETV Bharat / state

रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, एकाचा मृत्यू - जिल्हाधिकारी

रायगड जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, तीन रुग्ण बाधित आढळले होते. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, एकाचा मृत्यू
रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, एकाचा मृत्यू


रायगड - कोरोनाच्या महमारीने आधीच थैमान घातले असताना जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात पनवेल दोन तर खोपोली एक असे तीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. म्युकर मायकोसिस आजारामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून घरगुती तयार केलेल्या मास्क पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. जिल्ह्यात या आजाराच्या इंजेक्शनच्या साठा जिल्हा रुग्णालय आणि पनवेल महानगर पालिका रुग्णालयात उपलब्ध आहे असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी
पनवेल दोन तर खोपोलीत एक रुग्ण, तीन पैकी एकाचा मृत्यूकोरोनाचा प्रादुर्भाव हा अजून सुरूच असून रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र त्यासोबत आता म्युकरमायकोसिस महमारीनेही डोके वर काढले आहे. राज्यात या आजाराचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये दोन आणि खोपोलित एक असे तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन पैकी एका रुग्णाचा शुक्रवारी या आजाराने मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिस आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे. स्वतःची स्वच्छता राखण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहनकोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांना मधुमेह वा इतर गंभीर आजार असणाऱ्यांना म्युकर मायकोसिस आजार जडत आहे. त्यामुळे कोरोना उपचार घेण्यास आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या मागील आजाराची माहिती डॉक्टरांना देने गरजेचे आहे. जेणे करून औषधोपचार करणे सोपे जाऊ शकते. नागरिकांनी मास्क वापरताना कापडी मास्क वापरत असतील तर ते धुतल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरायचे आहे. अन्यथा फंगस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्दश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details