रायगड -जिल्ह्यात रोहा तालुक्यात वरसगाव तलावात एक तर पेण तालुक्यात अंबा नदीत एक असे वेगवेगळ्या ठिकाणी २ जण बुडाल्याची घटना आज दुपारी घडली आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना स्थानिक ग्रामस्थ मदत करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ दिवसात एकूण ७ जण बुडाले आहेत.
आशिष शेफूड (वय ४०, रा. महादेव वाडी, धाटाव, रोहा) आणि रवी चव्हाण (वय ४० रा. चुनाभट्टी, मुंबई) असे बुडलेल्यांची नावे आहेत. रोहा तालुक्यातील कोलाड येथील आशिष शेफुडे हे वरसगाव येथे तलावात मित्रांसोबत पोहण्यास गेले होते. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.