पुणे - दुष्काळी संकट आणि सध्या परतीच्या पाऊस, अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात 5 नोव्हेंबरला (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय बाळु मस्के, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - youth in khed attempt sucide
खेड तालुक्यातील किवळे गावात राहणारे मस्के कुटुंब हे अवघ्या 27 गुंठे शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, शेतीत काही पिकत नव्हतं. शेतीला कोणता जोडव्यवसायही नव्हता. त्यामुळे मस्के कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता.

कर्जबाजारीपणाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड तालुक्यातील किवळे गावात राहणारे मस्के कुटुंब हे अवघ्या 27 गुंठे शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, शेतीत काही पिकत नव्हतं. शेतीला कोणता जोडव्यवसायही नव्हता. त्यामुळे मस्के कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा होता.
खेडमध्ये कर्जबाजारीपणाला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
धनंजयने शेतीसोबतच नोकरी करण्यासही सुरूवात केली होती. तरीही कर्जाचा डोंगर कमी होत नव्हता. याच निराशेतून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.