महाराष्ट्र

maharashtra

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या कामगार तरुणी संकटात; पगार मिळेनात खायचं काय?

By

Published : May 10, 2020, 10:26 PM IST

लॉकडाऊननंतर कामगारांना आपल्या मुळगावी परत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मागील दोन महिन्याचे पगार मिळाले नसल्याने गावाला जायचं कसं असा गंभीर प्रश्न या कामगार मुलींसमोर उभा आहे.

ranjangaon midc
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या कामगार तरुणी संकटात; पगार मिळेनात खायचं काय?

पुणे - रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे खायला अन्न मिळत नसल्याने कामगारांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर विदर्भातील बॅचलर कामगार तरुणी वेगळ्याच संकटात सापडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही पगार मिळत नाही गावाला जायचं कसं? असा प्रश्न सध्या या तरुणींसमोर उभे आहेत.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या कामगार तरुणी संकटात; पगार मिळेनात खायचं काय?
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक तरुण मुली कामानिमित्त वास्तव्याला आहेत. लॉकडाऊन नंतर या मुलींच्या हाताला काम नाही, रोजचा खर्च, खोली भाडे द्यावे लागत आहे. फेबृवारीपासून या मुलींना पगार मिळत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तर मदतीसाठी कंत्राटदारही फोन घेत नसल्याने कामगार मुली लॉकडाऊनच्या काळात संकटाचा सामना करत आहेत. लॉकडाऊननंतर कामगारांना आपल्या मुळगावी परत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मागील दोन महिन्याचे पगार मिळाले नसल्याने गावाला जायचं कसं असा गंभीर प्रश्न या कामगार मुलींसमोर उभा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details