महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 14, 2020, 3:33 PM IST

ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरींसह पांढरं धुकं; शेतकऱ्यांची वाढली चिंत्ता

सोमवार सकाळपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतमालावर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

White fog
पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरींसह पांढरं धुकं

पुणे -जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. आज सकाळपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतमालावर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला मात्र शेतीशिवाय पर्याय नाही. असं म्हणत शेतकरी पुन्हा उभारी येऊन शेतात काबाडकष्ट करत असताना आता अवकाळी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उभारीला आलेला शेतमाल खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरींसह पांढरं धुकं
कोरोना महामारीचे लॉकडाउन त्यानंतर चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि शेतमालाची थंडावलेली बाजारपेठ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल कवडीमोल बाजारभावाने विक्री होत असताना शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता या संकटावर मात करत शेतकरी पुढे जात असताना आज सकाळपासून वातावरणातील बदल व पावसाच्या सरी सुरू झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details