पुणे- राज्यात विरोधकच शिल्लक नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. देशात लोकशाही जिवंत आहे याचा विसर भाजपच्या लोकांना पडलेला दिसतोय, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केला. ते पुणे जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी युती सरकारवर टीका केली.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, एकीकडे राज्यात पूर परिस्थिती होती, तर दुसरीकडे राज्यकर्ते जल्लोष यात्रा काळात होते. या काळात जनतेला मदत मिळाली नाही. राज्य सरकार निष्क्रिय होते आणि याचा फटका या राज्यकर्त्यांना निवडणूकीत बसेल, असे विश्वजीत कदम म्हणाले.